Total Pageviews

Friday, July 19, 2013

हेवन करेंगे

UPA के सरकार के कार्यकाल में जनता त्रस्त हो चुकी है , भ्रष्टाचार आसमान छू रहा है.
ऐसे हालात में चुनाव के वक़्त विपक्ष UPA की निंदा और खुद के अच्छे कामोंके वचन एक ही गाने में कुछ इस गाने की तरह देंगे : 
(विडंबन के नीचे फिल्मी गाने के बोल  लिखे  है )

(विडम्बन)

ओय भरतखंड युपीए का झुंड
ओय भरतखंड पीएम भी ठंड
ओय भरतखंड प्रगती भी मंद
छायी काली रात, सुनसानी रात
रख दिल पे हाथ , हम साथ साथ
बोलो क्या करेंगे ???
heaven करेंगे , heaven करेंगे, heaven करेंगे
ए वन करेंगे, ए वन करेंगे, ए वन करेंगे .......



अभी कायदेकानूं सब सो रहे होंगे
आम नागरिक रो रहे होंगे
छायी काली रात, सुनसानी रात
रख दिल पे हाथ , हम साथ साथ
संकल्प करेंगे ….
heaven करेंगे, heaven करेंगे, heaven करेंगे
ए वन करेंगे, ए वन करेंगे, ए वन करेंगे



खाता उई  पीता उई
खाता पीता सो जाता
सारे उई  पैसे उई
सारे पैसे पचाता
>>>विकाsssस थाम
खाता पीता पचाता (आहो)
तभी तो नेता केहलाता (आहो)
>>>विकाsssस थाम

हो तीखे तीखे से गर्व का इनके
होय चीख चीख के गर्व का इनके
हो तीखे तीखे से गर्व का इनके
हरण करेंगे हरण करेंगे हरण करेंगे
heaven करेंगे , heaven करेंगे, heaven करेंगे
ए वन करेंगे, ए वन करेंगे, ए वन करेंगे


यु ट्यूब लिंक:



(फिल्मी बोल )
ओए हवन कुंड मस्तों का झुंड
सुन सारी रात अब
ऐसी रात रख दिल पे हाथ हम साथ साथ
बोलो क्या करेंगे

हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
ओए जीव जन्तु सब सो रे होंगे
भूत प्रेत सब रो रे होंगे
ऐसी रात सुन सारी रात रख दिल पे हाथ
हम साथ साथ बोलो क्या करेंगे
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..

नहाता धोता
नहाता धोता सुखात
सारे आर्डर
सारे आर्डर बजाता
परदे थम
नहाता धोता सुखात आहो ..
सारे आर्डर बजाता आहो ..
तभी तो फौजी कहलाता
परदे थम..

दौड़ दौड़ के लोहा अपना
बदन करेंगे ...बदन करेंगे हवन करेंगे

ओये जीव जंतु सब सो रे होंगे
भूत प्रेत सब रो रे होंगे
ऐसी रात सुन सारी रात रख दिल पे हाथ
हम साथ साथ बोलो क्या करेंगे
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..

ओ जंगली आग सी भड़कती होगी
लकड़ी दिल की भी सुलगती होगी
ऐसी रात सुन सारी रात दिल पे हाथ
हम साथ साथ बोलो क्या करेंगे ...
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..
हवन करेंगे..हवन करेंगे..हवन करेंगे..


Thursday, June 27, 2013

Verge






Sometimes watching cricket isn’t even about hope. It’s purely about love. On Sunday evening – or Night, I should be saying – of 23rd June 2013, it was exactly because of love towards the game, even after being dead certain that India has no chance of winning this Champ Trophy Final, that I continued to watch the match.. I even asked my father in the mid-innings break, "Why am I watching this?? To win a match after only scoring 129 in an ODI -turned -Twenty20 is impossible". My father just smiled and continued to watch. And I followed him … without moving an inch from my chair for next two and half hours. Ohh dear ! Exactly how much my cricket-love weighs ?? I celebrated every bit of the match – cursing almost all Ishant Sharma deliveries (barring THOSE two), admiring the ultra-perfect reverse sweeps by Bells and Morgans, wondering how far ‘Sir’ has come. And as final 4 overs unfolded and the Indians pulled the victory from the jaws of defeat, I could actually hear my heart beats (the ones before last ball were almost as loud as Daya's bangs on closed door to burst it open). And then the joy followed. The sense of being on top of the world!! I watched it all… the post-match interviews, the Gangnam styles, the push-ups, the drilling analysis of irrelevant things like who pitched maximum deliveries on good-length while bowling to an opening batsman and which left hander scored most runs against  an off-spinner between 8 to 16 overs …. Not a single moment was to be missed.

All the players jumped and hugged and shouted, and then, finally, donning the odd-for-the-occasion white coats grabbed the trophy and posed for the Championship photo. It was exactly THAT precise moment a feeling spread all over my senses, however delightful this victory may be, this is not MY team. I felt like being at a distance from almost all these team members. There’s almost no-one there from the team that I grew up with. I suddenly felt old – much older than I actually am. So much so that I could start uttering a beloved phrase by an oldie, "Things were different then"
One by one everyone’s gone. With Laxman, Ganguly , Dravid long gone, Sachin’s departure last year, Zaheer’s ever-unfit body having a final say over his desire to play again, Sehwag and Bhajji almost certainly on the no-return-back road, only Yuvraj and Gambhir having an outside chance of coming back, given Selectors and Dhoni allow them to. I feel harder to connect with the current Indian players. This is not to say that I don’t like them or I don’t want to watch their matches – it will only happen after my last breath. But it’s something like admiring a hot new ultra sleek Audi but not wanting to ride it.
Often, at most satisfying moment in a man’s twilight of life, his memories just flood with all the moments of hope from his past life. Similarly for a scholar conquering every hurdle of exam, moments from first few exams - mixture of anxiety, will, faltering and succeeding - always hold a special space in heart. They might not be all perfect success moments but those have given a cause, a reason to live for. Exactly such was the case here. Dhoni is most successful and most-intelligent-on-field captain for India. Not a single feather is missing from his cap. Yet I feel Ganguli bound the team together like never before. Disputes between players, groupism based on regional influences were almost gone under his captaincy. When Dhoni was an undefeated captain for first two years, it was often said, and rightly so, that "Ganguly was a good captain of a team and Dhoni is a captain of a good team".  (Though, after this Champ Trophy triumph, I must admit that Dhoni has built a very good team of not-yet-great players… just like Ganguly did).  
Time and again, I can’t stop thinking of Romantic Era of first decade of this millennium. Until then victories on foreign soils were as alien as acting is to Arjun Rampal. The Golden Gang changed that. Laxman- Dravid were the pioneers of it in Kolkata with Ganguly and John Wright accompanying as guardians. The captain-coach duo pushed Bhajji, Yuvi, Zaheer and Sehwag  to greatness.  Foreign tours began to become fruitful. On the tour Downunder in 2003-04, they were supposed to run for shelters against the mighty Australians. Ganguly was considered to be most prone to failure on fast pitches. Instead, at The Gabba he turned the table with the probably the best series-defining century on fthe oreign soil. This led Indians to draw the series 1-1 with mighty Aussies. (If only Parthiv Sloppy Patel hadn’t missed the opportunity of dismissing Steve Waugh and Gillespie). With the Fab Five (Viru, Sachin, Dravid, Laxman and Kumble) - which any team in any time period will die for - Ganguly composed such a tune and everyone contributed with such a perfect lyrics of their own style, that an unforgettable beautiful song was born. And that will certainly be remembered like a SD Burman classic.

Interestingly this success story was written with not-so-great fast bowling stock. Barring Zaheer, no one was consistent enough to get a long run. Yet Multan, Rawalpindi, Headingly, Galle, Jo’burg, Durban, Perth, Jamaica, Napier, Trent Bridge happened.  Many of the seamers played cameos. Many times, whenever the team needed to punch above the head, someone stood up. Zaheer succumbed to injury at the start of the series v/s Aus in 2003-04 but Agarkar bowled the spell of his life in Adelaide to make sure Dravid’s efforts weren’t going in vain 2007. Again in when Zaheer had another injury RP Singh and Ishant Sharma carried the burden brilliantly. Sreesanth did it twice in two tours of South Africa. Even Munaf bowled superbly to get rid of Lara to give decisive blow to Windies in 2006 series. In the meantime they were almost unbeatable at home. Kumble and Harbhajan were enough to destroy every team that toured India. Ohh dear God, So much stories to tell, so little time. Afterall you just can’t get enough of fairy tales.
Everything was not so sweet each time though. Shameful loss against England in Mumbai where the Indians were 100 all out, dust biting downfall from 100/1 at lunch to 200-odd all out by the evening against Pak at Bangalore, the Guru-Greig  saga, Gone-in-60-secondesque exit from 2007 World Cup (which completely spoiled my B’day on the next day), surrender against the duo of Murali-Mendis were absolutely disheartening. But yet, those were sensing like punctuation marks in the statement that Team India was making strongly. It was more of a reminder that they were, afterall , humans climbing the mountain unlike rude inhumans like Australians, who failed to attract any kind of love from any corner of the world. After all who loves butcher over a painter.
The good thing was that even while the baton continued to pass from Ganguly to Dravid to Kumble to Dhoni the Indians kept on winning. Victories were accompanied by some best back-against-the-wall displays in Draws. In 2002, Sachin-Dravid-Ganguly , Brahma-Vishnu-Mahesh of Indian Cricket, secured the improbable draw against England at Trent Bridge. In 2008-09 at Napier, at the end of the third day the Indians were batting second with 300-odd run deficit. But then came the marathons by Gambhir and Laxman along with almost everyone's contribution and this test was saved miraculously. In Last test on the SA tour in 2011 the Indians had whole day to survive against devils like Steyn and Morkel, and they did it by losing just 3 wickets. Given India’s some previous record, last day collapse was always at a stone’s throw away. Yet they saved it. Comprehensively.
All through the decade the core of Team India in was same. Fab Five, plus Harbhajan, Yuvraj, Zaheer and Gambhir. It was an interesting blend of personalities. On one side, there were thorough gentlemen like Sachin, Kumble, Dravid, Laxman and on the other hand, there were fire brands like Bhajji, Yuvraj and Zaheer who would refuse to wince when they looked into eyes of the opposition. This brand of controlled aggression was pioneered by their T-Shirt Twirling, Toss Delaying captain 'Dada'. He transformed a team from 'home tigers' to 'warrior travelers'. The ODI performances were somewhere between very good and great. They kept entering every single tournament-final but kept losing all but one of them (That glorious exception was Yuvraj-Kaif fame Natwest Trophy Final in 2002).
And then suddenly, out of nowhere, wheels came off. The train not just derailed but crashed so heavily that the passengers like Dravid and Laxman (who were actually drivers, until then) had to depart to the point of no return. Sehwag and Gambhir - the best test opening pair of India - were pushed from the train, fairly so because they were travelling with expired tickets. Yuvraj was already travelling standing because he never had confirmed reservation for Tests, so no efforts were needed to push him. Only The God is remaining now. That too in tests, not in ODI.  The enitire 0-8 thing outside India and 1-2 loss in home conditions against England were blow beyond tolerance. I sensed the beginning of the end when Dravid retired. Until then I had saved my tears for Sachin’s retirement. I even managed to hold them back while I read entire coverage of 'Dravid Dasvidaniya' press conference. But all it took to nudge them to start rolling was a Harsha Bhogale article on cricinfo. I couldn’t imagine Test cricket without THE WALL. I was upset for few weeks after that.
Then just before NZ series Very Very Special Batsman waved towards fans. I was outraged.  For all his heroics and fifties with tail and silky drives and an affair with Aussie bowling, he deserved a far better farewell. I was cursing Dhoni like never before, whose lack of approachability was believed to be behind his departure. With Kumble and Ganguly long gone, remaining soldiers, one-by-one, started to call it a day. Look of Indian team became raw one, but it did some fabulous things too. New guys are sprinting between the wicket like a hare, fielding has become jaw-droppingly sensational and they are not carrying the burden of being gentlemen on the field. If there was any proof needed of changing guards, I think it was this Champ Trophy. As a true admirer of cricket, this new team gave me tremendous joy mixed with absolute thrill, but it's the team between 2001 and 2012 that gave me Goosebumps actually. I like current Team India very much but the previous one felt like family I grew up with. It is, you know, like Love. However much you love your successful married life, you will have a special place in the heart for your first love affair.

Few weeks ago, while staring at myself in a mirror, I noticed several gray hair. "It's because of pollution and my carelessness to condition them. I am not an old guy yet", I consoled myself. But the moment Team Young India the lifted the trophy and erupted in the midnight, a sudden strong (and disturbing) feeling told me that hair weren't lying after all.

Wednesday, May 15, 2013

'गृहित'क मोडताना

गेल्या वर्षीच्या चित्रपटांमध्ये मला बर्फी, वासेपूर, तुकाराम, काकस्पर्श खूप आवडले, पण काळजात घर केलं ते 'इंग्लिश विंग्लिश'नेच. मला वाटते इंग्लिश विंग्लिश हा ’अपने हाथोंसे बनाया हुवा गाजर का हलवा’, ’वडील गेल्यानंतर आईने केलेले काबाडकष्ट’ असला कोणताही मेलोड्रामा न दाखवता देखील आईचा आणि गृहिणीचा केलेला गौरवच आहे. नुकताच 'मातृदिन' साजरा झाला. तर त्या निमित्ताने आज याच चित्रपटबद्दल लिहितोय...







इंग्लिश विंग्लिशबद्दल प्रोमो पाहिल्यापासूनच उत्सुकता होती. एक तर श्रीदेवी परत येत होती आणि विषय इंटरेस्टिंग वाटत होता. त्यामुळे रिलीज झाल्याझाल्या लगेच थिएटर गाठलेच …
बहुतांश वेळेस साधारणपणे सिनेमा सुरू झाल्या नंतर पहिल्या १० - १५ मिनिटात आपोआप मन 'सिग्नल' देते की सिनेमा चांगला असणारे की नाही. तसा इंग्लिश विंग्लिश पहिल्या दहा मिनिटातच पकड घेतोय हे जाणवायला लागले.

चित्रपट सुरु होतो तो सकाळच्या चिरपरिचित दृश्यांनी. गजर झालाय, गृहिणी शशी गोडबोले (श्रीदेवी) उठून तडक कामाला लागलीये …. नवरा निवांतपणे अंथरुणात लोळून मग उठतोय…  पेपर वर पहिला हक्क त्याचा. पेपर वाचता वाचता आपसूक चहाचा कप त्याच्या हातात दिला जातोय. त्यातच घरातल्या कच्च्या बच्च्यांची आवरा आवर चालू आहेच. या सगळ्यामध्ये तिची प्रचंड धावपळ होते. अखेर मुलं, नवरा घराबाहेर पडल्यावर तिला वेळ मिळतो तो स्वतःच्या छंदासाठी , आनंदासाठी. ऑर्डरप्रमाणे लाडू बनवून देणे, हे खरेतर एक कामच, पण शशीला ते काम वाटत नाही. कारण ते तिच्या कार्यक्षेत्रातलं आहे  - स्वयंपाकघरातलं ! शशी सुगरण आहे. दुसऱ्यांना खायला करून घालणे तिला मनापासून आवडते. चार घरच्या लोकांना लाडू खूप आवडले हे सांगायला ती उत्साहाने फसफसत नवऱ्याला फोन करते तेव्हा तो तुटकपणे "कामात आहे नंतर बोलू" असे सांगून त्या उत्साहावर माती टाकतो.… तेव्हा जाणवते की इथे कणसूर लागतोय.  घरच्यांसाठी एवढं सगळं करूनही शशीची मैफल म्हणावी तशी रंगत नाहीये. कारण या आणि पुढच्या काही प्रसंगातून दिसते की तिला गृहित धरले जात आहे, नवऱ्याकडून , मुलांकडून. आणि त्याचबरोबर तिच्या मोडक्या इंग्रजीची पण वेळोवेळी टिंगल होतीये….

पुढे भाचीच्या लग्नासाठी शशी अमेरिकेत जाते आणि तिथे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून चारचौघात अपमानित होण्याची वेळ ओढवते तेव्हा मात्र ती नेटाने पण कोणाच्याही नकळत spoken english कोर्स करून इंग्रजी शिकते. ऐन परीक्षेच्या वेळेस मात्र कितीही तीव्र इच्छा असली तरीही भाचीच्या लग्नातल्या गडबडीमुळे परीक्षेला जाऊच शकत नाही. पण योगायोगाने लग्नाच्या समारंभात इंग्रजी  संधी तिच्याकडे चालून येते आणि ती त्याचे सोने करते आणि गंमत म्हणजे त्या समारंभाला उपस्थित असणारे तिचे इंग्रजीचे गुरुजी तिला परीक्षा पास झाल्याचे प्रशस्तीपत्रक सुद्धा देतात.

चित्रपटाची गोष्ट सांगायची झाली तर ती इतकी साधी सोप्पी आहे. पण पडद्यावर ज्या कौशल्याने ती विणली आहे आणि सुंदर त्यात रंग भरले आहेत की आपल्याला ती अगदी खोल जाऊन बसते.

लेखक-दिग्दर्शिका गौरी शिंदेला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. चित्रपट सुरु होतो आणि पहिल्या दहा मिनिटात ती गोष्ट केवळ शशीची नाहीच हे अगदी जाणवायला लागते. ही तर तुमच्या माझ्या आईची, काकूची, मावशीची गोष्ट वाटायला लागते. तपशील वेगळे पण गोष्ट हीच. एका गृहिणीला गृहीत धरले जाणे हे तुमच्या माझ्या आयुष्यात इतके नित्याचे झाले आहे की ते एरवी आपण जाणूनच घेऊ शकत नाही. पण जेव्हा एखादी गौरी शिंदे एक आरसा धरून आपल्याला ते दाखवून देते तेव्हा मात्र कडकडून जाणवते, आपले या ’गृहीत धरण्य”कडे किती सातत्याने दुर्लक्ष होते ते.  

चित्रपटाचा आलेख खूप छान आहे. सुरुवातीला अगदी छोटेसे असणारे शशीचे जग, अमेरिकेत आल्यावर अचानक मोठ्या अवकाशात आल्यावर सुरुवातीचे भांबावून जाणे, इंग्रजीच्या शिक्षकाने तिचा enterpreneur म्हणून गौरव केल्यामुळे तिच्यामध्ये येणारा आत्मविश्वास, मुलगा धडपडतो तेव्हा आपण आपले कर्तव्य बजावले नाही म्हणून निराश होऊन इंग्रजीची शिकवणी सोडून देणे, पुन्हा एकदा जिद्दीने परीक्षेची तयारी आणि लग्नाच्या ऐन गडबडीत लाडू वाया गेलेले पाहून हे जणू आपल्यातल्या गृहिणीच्या आणि मुख्य म्हणजे सुगरणीच्या स्वाभिमानाला ललकारले जाणे आहे असे मानून पदर खोचून मेहनतीने सगळे लाडू पुन्हा करणे हे सगळे फार सुरेख साकारले आहे. इतर कितीही गोष्टी आवडीच्या असल्या आणि त्या मनापासून कराव्याश्या वाटत असल्या तरी कोणत्याही गृहिणीला स्वयंपाकघर हे खरे कार्यक्षेत्र आणि आपल्या आप्तांचे समाधानी चेहरे ही खरी कमाई वाटते, अशी अस्सल भारतीय मानसिकता अगदी तंतोतंत टिपली अहे.

संपूर्ण चित्रपटात खास दिग्दर्शकीय स्पर्श असलेल्या कित्येक जागा आहेत. त्यातल्या थोड्या सांगतो :

चित्रपटाच्या सुरुवातीलाच नवरा चहा पिताना पेपर वाचतोय असा प्रसंग आहे. अमेरिकेत गेल्यावर एका निवांत क्षणी शशी पेपर वाचत असते इतक्यात नवऱ्याचे फर्मान येते , "चहा ss " आणि तो तिकडे येउन तिच्याकडून पेपर घेतो… स्थळ बदलले, काम नाही !!

नवरा शशीला गृहीत धरत असला तरी तो वाईट नाहीये. त्याचेही तिच्यावर प्रेम आहे. जेव्हा खूप दिवसांनी तो अमेरिकत तिला भेटतो आणि तिला जवळ घेणार तितक्यात मुलगा कुरकुरत येतो " आई sss झोप येत नाहीये" आणि थेट तिच्या कुशीत शिरतो. संपली जवळीक. "स्त्री अल्पकाळची पत्नी आणि अनंत काळची माता असते" हे आत्यंतिक घिसे पिटे वाक्य, पण त्याचा अर्थ पाच सेकंदात समोर उलगडतो तो असा.…

पुढे लग्नाच्या सगळ्या गडबडीत शशी आवरण्यासाठी खोलीत येते तेव्हा तिला दिवाणावर एक सुंदरशी साडी ठेवलेली दिसते. नवऱ्याने आणलेली खास … संपला शॉट ! अगदी हळुवार …

चित्रपटाच्या अगदी शेवटी शशी सगळ्यांना एक एक लाडू वाढत पुढे जात असते नवऱ्याच्या ताटात मात्र एक लाडू जास्त वाढते …. विशेष काळजी :)

याशिवाय एक कॅमेरा angle खासच आठवतोय. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये शशीने पुन्हा लाडू वळायला घेतलेत, तिची अमेरिकेतली भाची प्रामाणिकपणे लाडू वळण्यात मदत करतीये, तेव्हा दोघींच्या हातांवर रोखलेला कॅमेरा : भाची प्लास्टिकचे ग्लोव्हज घालून 'हायजीनिक' पणे लाडू वळतीये आणि बाजूला  शशीच्या लाडू वळणाऱ्या हातात काहीच नाहीये - अध्याहृत गोडवा तेवढा आहे.

यातली तीन पात्रं मला विशेष आणि त्यांचे शशीशी असणारे नाते मला फार आवडले.
पहिलं पात्र : सुलभा देशपांडेंनी साकारलेली गोड सासू. थोडीशी मिश्किल. सून फोनवर चौकशी करते, 'तुम्हालाच काम करावं लागतंय' म्हणते तेव्हा त्या म्हणतात "बिनधास्त राहा तिकडे… मला काही कामं करावी लागत नाहीत, मी कामं करवून घेते. म्हातारी झाल्याचा हाच तर फायदा आहे ". रोजच्या व्यापातून सुनेला सुद्धा मोठ्ठा ब्रेक हवा हे त्यांनाही जाणवतंय. कारण त्या स्वतः देखील याच रगाड्यातून पूर्वी गेलेल्या असणारेत…

दुसरं  पात्र : शशीचा फ्रेंच सहाध्यायी. भाषा, देश, संस्कृती सगळे काही वेगळे असताना शशीकडे आकर्षित झालेला, शशीला सुद्धा प्रथमच ती सुंदर आहे हे शब्दातून जाणवून देणारा पण तरीही संयमी, शांत, मर्यादेत राहणारा मित्र … कित्येक वेळा शशी त्याच्याशी तावातावाने किंवा उत्साहाने नकळत हिंदीतच बोलते तेव्हा तिचे भाव टिपणारा समंजस मित्र. आणि शेवटी शशीच्या भाचीच्या लग्नाच्या वेळी शशीला भाषा समजली नाही तरी भाव समजतील याची खात्री ठेऊन फ्रेंच मधेच बोलणारा मनस्वी मित्र ….  खूप भिडणारं पात्र.

तिसरं पात्र : शशीची धाकटी भाची … शशीच्या कुटुंबाची सदस्य नसल्यामुळे असेल कदाचित पण  शशीला गृहीत धरले जाणे तिला जाणवते आहे. ठरलेल्या चौकटीबाहेर जाऊन शशी स्वतःच्या हिमतीवर इंग्रजी शिकते आहे याला तिचा पूर्ण पाठिंबा आहे. "जन्मभर लाडू बनवणे यातच तुझे इतिकर्तव्य नाहीये" असे ठामपणे मावशीला सांगणारी आणि मावशीला घरच्या कार्यामुळे परीक्षा देत येणार नाही हे कळल्यामुळे मनापासून दु:खी होणारी भाची खरेतर शशीची मैत्रीणच आहे. फ्रेंच मित्राला शशी आवडते हे कळल्यावर ती मैत्रीच्या नात्याने विचारते सुद्धा "तुला तो आवडतो का" त्यावर शशीचे उत्तर फार छान आहे "मला प्रेमाची आवश्यकता नाहीये , आवश्यकता आहे ती सन्मानाची". किती साधं पण किती नेमकं उत्तर !

कथेची मांडणी आणि त्यातले बारकावे हे यातले प्रमुख घटक असले तरी चित्रपटाला चार चांद लावलेत ते दोन गोष्टींनी. पहिली म्हणजे श्रीदेवीचा अविस्मरणीय अभिनय. चित्रपट येण्यापूर्वीच तिचा comeback म्हणून मला फार उत्सुकता होती. ती तिने फोल ठरवली नाही.    विचित्र थरथरत्या आवाजाच्या उणीवेवर तिने सूक्ष्म हावभावांनी आणि डोळ्यांनी सहज मात केली आहे. तिच्या पिढीच्या कुठल्या अभिनेत्रीला (माधुरी वगैरे)  ही भूमिका निभावता आली असती असे वाटतच नाही. त्यामुळे तिला १ ० ० पैकी  १ ० ० गुण.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेवाद्वितीय अमित त्रिवेदीचे संगीत. हा माणूस अजब रसायन आहे. अनुराग कश्यप सोबत काम करतो तेव्हा त्या चित्रपटामधला सगळा अत्रंगीपणा याच्या संगीतात उतरतो. आणि इथे इंग्लिश विंग्लिश सारखा करताना त्याला साजेशी अशी 'जियारा धाकधूक होय…' आणि 'नवराई माझी…' सारखी सुंदर गाणी देतो

 (धाकधूक…  या गाण्यामध्ये मुलांना सोडून दूरदेशी जायचे या कल्पनेने आई हळवी झालीये

 'घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलांपाशी'  अशी काहीशी कातर अवस्था अमित त्रिवेदीच्या संगीतातून आणि गायक म्हणून गळ्यातूनसुद्धा तंतोतंत उतरली आहे ….)   एकुणात काय तर हा चित्रपट मला अंतर्बाह्य आवडून गेला. अनेक चित्रपट आवडतात. पण मोजकेच असे असतात हे मनाच्या कप्प्यात जाऊन बसतात. त्यातलाच हा एक… एका समीक्षकाने याला अडीच 'स्टार' दिले होते, एकाने म्हटले होते " 'इंग्रजी न येणे म्हणजे उणीव आणि ते आले म्हणजे काही विशेष होणे' अशी मानसिकता यात का आहे" मला वाटते या दोघांनाही या चित्रपटाचा आत्माच समजलेला नाहीये. असो. एकाच गोष्टीबद्दल लोकांची मते वेगवेगळी असू शकतात. मला चित्रपट भावला कारण मी रोज घरात, आसपास पाहत असलेल्याच गोष्टी यात आलेल्या आहेत. प्रेम करणारी आई आहे, गृहीत धरणारे पण वाईट नसणारे कुटुंबीय आहेत, एक आपलीशी वाटणारी कुटुंब संस्था आहे.  मातीतला चित्रपट म्हणजे असते काय दुसरे ? झोपडपट्टी, शेतकऱ्यांचे हाल, अंधार, दारिद्र्य, शोषितांचे दु:ख दाखवले म्हणजेच मातीतला चित्रपट होतो असे थोडेच आहे ? अपूर संसार, सलाम बॉम्बे जेवढे या मातीतले होते तेवढेच घरोंदा, छोटीसी बात आणि अभिमान पण होते. आणि ८० % चित्रीकरण देशाबाहेर होऊनसुद्धा 'इंग्लिश विंग्लिश'  सुद्धा तितकाच अस्सल 'मातीतला' आहे. चित्रपट बघून परतलो तेव्हा माझा आईकडे पाहायचा दृष्टीकोन जास्त व्यापक झाला एवढे नक्की. पहिला नसल्यास नक्की पहा.  तुमचाही नक्की होईल. आई, सून, बायको, बहीण, मावशी या सगळ्या भूमिका एकाच वेळेस वठवणारी त्यामधली गृहिणी ही फक्त चित्रपटातली नव्हे तर खऱ्या आयुष्यातलीही नायिका (खरेतर unsung heroine) आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले हे फार महत्वाचे आहे. धन्यवाद गौरी शिंदे !!!!

Thursday, May 2, 2013

गुरुवार

वार : गुरुवार
स्थळ : गजानन महाराजांचे देऊळ
वेळ : रात्री पावणे आठची

मोठ्ठ्या गेटमधून मी देवळाच्या आवारात प्रवेश करतो. देवळाच्या मोठ्ठ्या परिसरातल्या डावीकडच्या बागेकडे नजर जाते. कच्च्याबच्च्यांनी फुलून गेलेली. एक छोटासा ३-४ वर्षाचा मुलगा झोपाळ्यावर बसतोय आईच्या मदतीने. आई त्याला सावकाश बेताबेताने झोका देतीये. पोटात आतून कोणीतरी गुदगुल्या करतंय अशी गमतीदार भावना मुलाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतीये. त्याच्या शेजारच्या झोपाळ्यावरची ८-९ वर्षाची एक ताई मात्र दणाणून झोका घेतीये. बेभान वेगाने तिच्या चिमुकल्या वेण्या रानोमाळ उडतायत. घड्याळाच्या लंबकासारखे तिचे पाय झुलत आहेत. आभाळातून खाली यायचा अवकाश, दोन्ही पाय खाली येत खालच्या जमिनीला दणका देऊन झोपाळ्याला पुढे भिरकावत आहेत. झोपाळ्याच्या बाजूला सी - सॉ अविरत कुरकुरतोय. एका बाजूच्या पोराचा मधेच अंदाज चुकल्याने खाली सी - सॉची एक बाजू खाली आदळतीये, पण त्यामुळे पुठ्ठ्याला येणाऱ्या झिणझिण्या त्याच्या खेळण्याच्या आनंदात क्षणाचाही व्यत्यय आणू शकत नाहीयेत.
या सगळ्याकडे पाहताना हरवून जायची माझी खूप इच्छा असते, पण अजून देवळात जायचे बाकी असल्यामुळे बागेत बसायचा मोह आवरतो आणि देवळाच्या दिशेने जातो.
आत शिरण्यापूर्वीच देवळातल्या आरतीची तयारी जाणवायला लागते. आत जाण्यापूर्वी चप्पल काढण्यासाठी थांबतो. देवळाच्या बाजूला लोखंडाचे २-३ भीमसेनी चप्पल stand आहेत. देवळाच्या आत-बाहेरच्या यच्चयावत भक्तगणांच्या चपला बूट stand च्या बाजूला दशदिशांना विखुरलेले आहेत. एखाद्या बेशिस्त जेवणाऱ्याने अन्न चिवडून ताटाभोवती खरकटे सांडून ठेवावे तसे ते चपलांचे दृश्य मला ओंगळवाणे वाटते. ओठावर आलेली शिवी केवळ मंदिरात आलोय म्हणून गिळून टाकतो. स्वतःच्या चपला stand वरती ठेवतो तेव्हा माझ्या आधी काही शहाण्या लोकांचे चप्पल जोड आधीच तिथे सिंहासनावर बसल्याच्या ऐटीत तिथे आसनस्थ झालेले पाहून किंचित बरे वाटते आणि मंदिरात मी प्रवेश करतो.
आत पाऊल ठेवताच संगमरवराचा थंडगार स्पर्श एक शिरीशिरी उठवून देतो. दोन पावलावरच घंटेच्या खाली एक बारकू, हाताला न येणाऱ्या कैरीकडे बघावे तसा आशाळभूतपणे बघत उभा असतो. मी सरळ पुढे होऊन त्याच्या बखोटीत हात खुपसून त्याला उचलतो. कोणी उचललंय हे वळून पाहण्याची तसदी न घेता तो खुशीत येउन घंटेचे दोन-तीन घनघोर टोल देतो आणि अंग झटकून उडी मारून पसार होतो. मला समोर गाभाऱ्यातले दृश्य स्पष्ट दिसत असते. गडद निळे वस्त्र नुकतेच नेसलेले गजानन महाराज अधिकच तेजस्वी भासतात. गाभाऱ्याच्या बाहेर उजव्या हाताला तार सप्तकात भजन चालू असते. तश्या आवाजातही पेटीवाल्या बुवांच्या मांडीवर डोके ठेऊन त्यांची छोटुली नात शांतपणे कशी काय झोपलीये याचे मला नवल वाटते. बुवांच्या साथीला एक तरणा तबलजी आहे. गाभाऱ्याच्या सरळ रेषेत उभं राहून डोळे मिटून नमस्कार करणाऱ्या एका शेलाट्या मुलीकडे हळूच नजर फेकताना त्याच्या काळजाचा ठोका चुकत असला तरीही भजनी ठेका त्याने शिताफीने सांभाळून घेतलाय.
एव्हाना आरतीची तयारी पूर्ण झालीये जमा आहे. बागेत खेळणाऱ्या मुलांचे आई-बाबा, बाकीचे भक्तगण यांनी देऊळ शिगोशिग भरून गेले आहे. अगदी दाटी-वाटी झालीये म्हणा ना. पण या गजबजाटातही एक आदब आहे, शिस्त आहे.
निरांजन लावले जाते, पाठोपाठ एकेक करून कापूर, धूप वगैरेच्या वासाने गाभारा भरून वाहू लागतो. आरतीला प्रारंभ होतो आणि आरतीच्या मंगलचरणांनी संपूर्ण देऊळ भरून जाते. गेटबाहेर रेंगाळणारे चुकार लोक आरतीच्या आवाजाने लगबगीने देवळात येतात. देवळातल्या घंटेचा घणत्कार, गाभाऱ्यातून छोट्या घंटेची किणकिण, आरतीचे स्वर आणि उदबत्ती - कापूराच्या धुराने चोंदलेला गाभारा यामुळे अर्धेअधिक भक्त गण ट्रान्समध्ये पोचलेले असतात. आरत्यांची एकावर एक कमान चढत जाते. एकेक देव, एकेक महाराज अश्या सगळ्यांची दखल घेत आरत्या म्हणता म्हणता मी युगे अठ्ठावीस उभा आहे असा भास मला व्हायला लागतो. शेवटी एकदाचे 'घालीन लोटांगण' सुरु होते आणि पाठीच्या कण्याचा अक्ष करून त्या भोवती सगळे गिरकी घेऊ लागतात. आखडलेले पाय गिरकी घेता घेता मोकळे होतात. बाजूला नजर जाते तर एक सर्वांची गिरकी संपली तरी एक छोटा मुलगा मनाचे समाधान होईपर्यंत स्वतःभोवती भिंगरीसारखा गरगरत राहतो. मला हसू आवरत नाही. मंत्रपुष्पांजली फलश्रुती वगैरे सोपस्कार पार पडतात आणि काहीही सूचना न मिळताही सगळे जण दर्शनासाठी गाभाऱ्या बाहेर रांग लाऊन उभे राहतात. रांगेत भरपूर वेळ सरकत अखेर गाभाऱ्यात पोचतो तेव्हा सवयीने चटकन हात खिशात जातो. खिशातली चावली-पावली दान-पेटीच्या फटीतून आत सोडतो तेव्हा ढिगाऱ्यावर पडताना येतो तसा बद्दकन आवाज येतो….
गर्दी असली तरी वातावरण खूप प्रसन्न असते... महाप्रसादासाठी जय्यत तयारी झालेली असते… तरीही तिथे जास्त वेळ न थांबता मला बाहेर पडायचे असते. आवाराबाहेर बाहेर येतो आणि पावले चटाचट वळतात ती जेमतेम दोनेकशे पावलावर असलेल्या दत्त मंदिराकडे.
मंदिरापाशी येतो आणि जणू दुसऱ्या दुनियेत आल्यासारखे वाटायला लागते. महाराजांच्या देवळासारखी बाग, गर्दी, महाप्रसाद भरपूर उजेड यातले काहीच इथे नसते. बाजूची वाट, मंदिराचे आवार आणि खुद्द मंदिरातही अक्षरशः शुकशुकाट असतो. नाही म्हणायला चार दोन लोक असतात, पण त्यांचे वावरणेसुद्धा एकंदर शांततेला बाधा येऊ नये असे दबकूनच असते. देवळातल्या वातावरणावरची शांततेची साय उगीचच बाजूला होईल काय अशी भीती त्यांना वाटत असावी. बाहेरच्या रातकिड्यांची मैफल अगदी स्पष्ट ऐकू येत असते. देवळापाशी जातो आणि बाजूच्या दराने आत प्रवेश करायला जातो तेव्हा लक्षात येते नेहमीप्रमाणेच या बाजूचे दार बंद अहे. प्रवेशासाठी फक्त समोरचे दार उघडे अस्ते. तिथून आत जातो आणि घंटा वाजवतो - पण जर जपूनच. तेवढ्यानेसुद्धा मंदिरातली शांतता डहुळते. पुढे गाभाऱ्यापाशी जातो तिथेही सगळे कडेकोट बंद. अगदी गाभाऱ्याचा जाळीचा दरवाजा सुद्धा लावून घेतलेला असतो. पुजारी नाही की तीर्थ-प्रसाद नाही. एक बापुडवाणी उदबत्ती तेवढी नेटाने जळत असते. दत्त महाराज आपले एकटेच उभे असतात दरवाज्याच्या जाळीतून माझ्याकडे बघत. मी पुढे होतो पुन्हा एकदा खिशातली चवली-पावली काढतो. जाळीच्या दरवाज्यातून महत्प्रयासाने दोन बोटे आत प्रवेश मिळवतात आणि दरवाज्यालाच आतून टांगलेल्या दानपेटीत चिमटीतली नाणी सोडतात. पेटीत खणखणाट होतो. 'दत्त महाराजांची झोळी रिकामीच दिसतीये' असा विचार मनाला चाटून जातो.
एव्हाना देवळातले ते तिघे चौघेही निघून गेलेले असतात. गाभाऱ्यात लावलेल्या 'दिगंबरा दिगंबरा' या जपाच्या ध्वनिमुद्रिकेच्या अतिमंद आवाजामुळे देवळाच्या नीरव शांततेत काडीचीही बाधा येत नसते.
प्रदक्षिणा घालताना स्वतःशीच विचार करायला लागतो : गजानन महाराजांच्या देवळातले मोकळे ढाकळे वातावरणही मला आवडते. त्या देवळाला दारंच नाहीत. तिकडे सगळं कसं मोकळं ढाकळं, येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ. तरीही मला इकडे यावंसं का वाटतं ? दत्तदर्शन हे तर निमित्त आहेच, पण त्या पलीकडेसुद्धा इकडे आवर्जून यावं असं खेचून घेणारं इकडच्या निश्चल शांततेत काहीतरी आहे... इकडे आल्यावर स्वत:शी गप्पा मारायला मिळतात.... भरपूर प्रश्न विचारायला मिळतात... स्वतःबद्दल, भोवतालाबद्दल, अगदी या हाकेच्या अंतरावरच्या दोन मंदिरांबद्दलसुद्धा. उत्तरं मिळतातच असे नाही… उलट काही प्रश्न तर मला सतत टोचत राहतात.
तिकडे खुलेपणा, इकडे मात्र देवबाप्पा कडेकोट बंदोबस्तात … का ?
तिकडे फरसबंदी पटांगण, इकडे थोडके खडबडीत आवार… का ??
तिकडे लोक लांबून लांबून येणार, इकडे ढुंकूनही बघणार नाहीत … का ??
तिकडे लखलखाट, इकडे मोजून दोन दिवे …. का ??
तिकडे एवढी वर्दळ, इकडे सामसूम … का ?? गजानन महाराज म्हणजे दत्ताचाच अवतार ना ? मग अवताराच्या दर्शनासाठी झुंबड, आणि खुद्द देव-दर्शनाला मात्र शुकशुकाट …. का ???
नाही मिळत उत्तरं. मी निमुटपणे मंदिराबाहेर पडतो. सव्वानऊ होऊन गेलेले असतात. मंदिर एखाद्या समाधीस्थ साधूसारखे वाटत असते.… एकाएकी वाटून जाते, साक्षात दोन श्रद्धास्थानांमध्ये एवढा दुजाभाव करणारा मनुष्यप्राणी माणसा-माणसांमध्ये भेदभाव करत असेल तर त्यात नवल ते कसले….
घराच्या वाटेला लागता लागता मंदिरामागचा थोरला औदुंबर दिसतो. दत्ताला
त्याची तरी सोबत आहे हे पाहून मनोमन बरे वाटते…

Thursday, February 14, 2013

समांतर

लहानपणी नवख्या लोणच्याची चव पाहणं हा एक सोहळा असायचादुपारी आईची नजर चुकवून बरणीचे झाकण  हळूच उघडायचे...  लोणच्याची फोड जिभेवर टेकवायची... पाठोपाठ लोणच्यातल्या साखरेला बाजूला सारत करकरीत फोडींची आंबट जर्द चव करवती सारखी सरसरत शेवटच्या दाढेपर्यंत जायची आणि न आलेल्या अक्कल दाढेच्या मोकळ्या परिसरात विरघळून जायचीआहाहा ! 'अनुभूती' शिवाय त्याला दुसरा शब्द नाहीपण मोठा झालो तसतशी एक जाणीव व्हायला लागलीताज्या लोणच्याची चव हवीहवीशी असते हे खरे, पण खाल्ल्यानंतरही त्यातल्या साखरेची गोडी जेवणानंतर खूपवेळ रेंगाळत ठेवणारे मुरलेले लोणचेच जास्त समाधान देतेत्यामुळेच लोणचे ताजे ताजे खाण्यापेक्षा मुरल्यावर काही काळाने जास्त भावते, हे जाणवले.  'शाळा' आणि 'दुनियादारी' चे पण असेच आहे. अनुक्रमे शाळेत आणि कॉलेज मध्ये असतानाच ही पुस्तके वाचली तर आवडणार नाहीत असे नाही, पण त्यांची खरी मजा ही ते-ते कालखंड अनुभवून पुढे गेल्यानंतर वाचण्यात जास्त आहे. त्यातला गोडवा अधिक आहे, कारण अनुभव जास्त मुरलेले आहेत.


मिलिंद बोकिलांची 'शाळामी दहावी नंतर - वर्षांनी कॉलेजात असताना पहिल्यांदा वाचली आणि सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' सुद्धा कॉलेज संपल्यानंतर वर्षभराने पहिल्यांदा वाचलीवाचता वाचता माझ्यात आणि माझ्या आठवणीमध्ये पूल कधी बांधले गेले कळले सुद्धा नाही. दोन्ही अनुभव अगदी 'क्लोज टू माय हार्ट' म्हणावेत असे आहेत. दोन्ही वाचताना आलेला nostalgia  केवळ अशक्य !  
शाळेत असतानाएका अर्थाने हुकुमशाहीच म्हणावे अशा व्यवस्थेत वावरतानाआपण सतत शिस्तीच्या त्या पोलादी भिंतींमधून  एखादी फट दिसते का हे शोधत असतोआठवी-नववीत येताना सतत कसली तरी बंडखोरी करायला हात-पाय शिवशिवत असतात. प्रत्येकाच्या मनात आपल्या आजूबाजूच्यांना इम्प्रेस करण्याची सुप्त इच्छा  असतेच असते. फरक इतकाच की नाकासमोर चालणारी पोरं फक्त इमले रचत बसतात आणि वांड कार्टी बरं-वाईट काही ना काही करून दाखवतात. थोडक्यात काय, तर बंडखोरी, लाईन मारणे, धुडगूस घालणे, खच्चून शिव्या घालणे या गोष्टी आपण स्वतः केलेल्या तरी असतात किंवा आजूबाजूच्यांना करताना पाहताना कळत  कळत त्याला संमती तरी दिलेली असते. म्हणजे काय, तर पोरगा सुऱ्या तरी असतो नाहीतर जोशी तरी....    
शाळेत शिकत असताना 'शाळा'वाचलं तरी पौगंडावस्थेच्या एवढ्या सगळ्या छटा जाणवत राहण्याइतका समजूतदारपणा आपल्याकडे असतो कुठे ? म्हणूनच जोशीचं स्वतःशी संवाद  साधणं, सगळ्यामध्ये असूनही कशातच नसणं, सुऱ्याची मानसिकता या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो ते खऱ्या अर्थाने अधिक  कळत्या-जाणत्या वयातच शाळा सोडल्यानंतर 'शाळा' जास्त उमगत जातं ते याच कारणांमुळे.

पुढे कॉलेजमध्ये शिकताना बंधनं अर्थातच कमी होत जातात आणि त्या मोकळ्या वातावरणात श्वास घेणं अगदी विलक्षण वाटायला लागतं. भावनांना आवर घालणं शाळेत असताना जितकं सक्तीचं असतं तितकं ते आता वाटत नाही. शाळेतलं 'लाईन मारणंइथे अधिक धीट होऊन प्रेमाकडे झुकू पाहतं. शाळेतल्या लुटूपुटू मारामारीचं आणि खुन्नसचं 'grandeur' इथे वाढलेलं जाणवतं. अशा वातावरणात  घडणारी 'दुनियादारीकॉलेजमध्ये असतानाच वाचली तर आवडेलच पण कॉलेज सोडल्यानंतर काही काळाने मागे वळून बघतानाकॉलेजमध्ये असतानाचे आपले विचार, आपल्या भावना हे सर्व किती बालिश होते  आणि आपली स्वप्नं किती ठिसूळ होती हे जेव्हा लक्षात येते तेव्हा 'दुनियादारीवाचली तर ती आपल्याला जास्त भावते.  


दुनियादारी पहिल्यांदा वाचली तेव्हा अक्षरशः अधाशासारखी संपवली होती
'शाळा' वाचताना आलेला nostalgia  पुन्हा एकदा मळभ यावे तसा साचून आला होता. श्रेयसचा एकटेपणा, चिमटीत येतायेता सुटून जाणारे प्रेम, दिग्याचं सावरणं - विखुरणं, अश्वत्थाम्यासारखा भळभळणारा एम.के., तो पूर्णपणे आपला होऊ कधीही शकत नाही हे माहित असूनही त्याला अंतर  देणारी स्वराली यांचा असा काही गोफ सु.शिं.नी विणलाय की त्यात गुरफटायला होतं. कॉलेज मधल्या दंगामस्तीच्या आणि nostalgia च्या खूप पुढे जात,  नियती, आयुष्य, तिढे, अडकणं-निसटणं हे सारं सु.शि. आपल्याला कधी डून तर कधी थेट सांगून जातात... 


सामाजिक भान असणारे लिखाण करणारे मिलिंद बोकील आणि तथाकथित 'लोकप्रियते'चा शिक्का असणारे सुहास शिरवळकर यांच्या कलाकृती मी एकाच तागडीत तोलतोय हे काहींना आवडणार नाहीकारण 'शाळा' ला आणीबाणीची पार्श्वभूमी असल्यामुळे अर्थातच ऐतिहासिक, सामाजिक अंगाने 'शाळा'ची खोली अधिक आहे आणि त्यादृष्टीने 'दुनियादारी'ला असली कोणतीही विशिष्ट पार्श्वभूमी नाही. परंतु तरीही  'दुनियादारी' वाचल्यानंतर आलेल्या भारलेपणातून मी जेव्हा थोडा भानावर आलो तेव्हा मला 'शाळाआणि 'दुनियादारीविलक्षण समांतर भासल्या. मनाला भिडणं, हळवं करणं, 'पुन्हा ते दिवस कधीच येणार नाहीत हीबोच लावणं हे अनुभव या दोन्ही कलाकृती देतात आणि  संपताना विलक्षण हुरहूर लावून जातात.  

'शाळामधला जोशी आजूबाजूला यार-दोस्ताचं कोंडाळं असूनही 'रंगुनी रंगात साऱ्यारंग माझा वेगळा'  असा काहीसा आहे. तो स्वतःशी संवाद करणारा आहे, विलक्षण संवेदनशील आहे. शिरोडकरचं आकर्षण  हेच त्याला प्रेम वाटतंय. मात्र त्याचं नक्की निदान  करण्याइतकं त्याचं वय झालेलं नाहीये पण गोष्ट संपताना त्याच्या मनातला अंकुर चिरडला गेलायजोशीचं एकटेपण सतत अधोरेखित होतंय. आणि तिकडे 'दुनियादारीमधला श्रेयस हा जणू जोशीचाच आत्मा घेऊन आलाय. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जोशीपेक्षा पूर्णपणे वेगळी (आणि मोडकळलेली) आहे, पण तोही विलक्षण संवेदनशील आहेआजूबाजूला दिग्या, श्रीउन्मेष सग्गळे सग्गळे आहेतपण सगळ्यांमध्ये असूनही तो कोणाचाच नाहीये. त्याच्या प्रवासात  त्याच्यासह असणारी माणसं कितीही जवळची वाटली तरी ते फक्त सहप्रवासी आहेतआपले स्टेशन आले की उतरून जाणारे. प्रवास सुरु करताना आणि संपतान श्रेयससुद्धा जोशी सारखाच संपूर्ण एकाकी झालाय. श्रेयसलाही आकर्षण वाटतंय - मिनू आणि शिरीन दोघींबद्दल. पण नक्की कुणावर प्रेम  आहे आणि नुसते आकर्षण कोणाचे वाटते आहे याबद्दल   (जोशीपेक्षा वयाने मोठा असल्याकारणाने कदाचित खूप  जास्त विचार करत असल्यामुळे) गोंधळलेला आहे. आणि सरतेशेवटी त्याच्याही नशिबी त्याचं उमेदीतलं प्रेम नाहीये.

'शाळा' मध्ये सुऱ्या आहे तर 'दुनियादारी' मध्ये दिग्या. हे दोघेही लौकिकार्थाने मवाली, उपद्रवी वगैरे वगैरे वर्गात येतात. पण तरीही सरळमार्गी असणाऱ्या  जोशी आणि श्रेयसने त्यांना आपलं मानलंय. सुऱ्या-दिग्यालाही हळवं होता येतंव्हायला  आवडतं. प्रेम व्यक्त करायची त्यांची पद्धत रांगडी आहे पण सच्ची आहे. त्यात आड-पडदा नाहीगोष्ट संपतानाचं  दोघांचही अपयशी ठरणं, असहाय होणंमोडून पडणं मला हलवून गेलं.

शाळा आणि दुनियादारी या दोन्ही कलाकृतींमध्ये दिसत राहणारी स्वप्नं आपापल्या ठिकाणी कितीही प्रामाणिक आणि सच्ची असली तरी ती त्या-त्या पात्रांच्या आयुष्यातल्या अश्या नवथर आणि भावनाप्रधान टप्प्यांवर निर्माण झालेली आहेत की ती आपोआपच कचकड्याची ठरणारी आहेतमोडून पडणारी आहेत आणि म्हणूनच माझ्यासाठी दोन्ही पुस्तके वाचून संपतानाचे रितेपण सारख्याच खोलीचे आहे आणि डोळ्यात जमा होणारे थेंब सारख्याच उष्णतेचे आहेत ...